आमच्याबद्दल
बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगांव, ता. जि. बीड
बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगांव, ता. जि. बीड ही संस्था सन २००५-०६ पासून सेंद्रिय शेती मध्ये काम करत आहे. सेंद्रिय शेती योजना २०१३-१४ व २०१४-१५ अभियानांतर्गत सेंद्रिय शेती शेतकरी गटनिर्मिती प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे, मार्गदर्शन मेळावे अशा विविध प्रकारे सेंद्रिय शेती बाबत मोठी जागृती निर्माण केली आहे. रासायनिक खताचे, किटक नाशकाचे, निसर्गावर तसेच मानवी जीवनावर होणारिन्दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय खताची व बायोडायनॉमिक खताची निर्मिती वापर वाढविणे गरजेचे आहे. संस्थेने गेल्या नऊ वर्षांत गांडूळखत निर्मिती, बायोडायनॅमिक कंपोस्ट खत निर्मिती, हिरवळीचे खत, जीवामृत, दशपणी अर्क, निबोळी अर्क, निर्वाळी पावडर सी.पी.पी. निर्मिती, डिकंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकन्यांना दिले आहे. बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगांव ही संस्था महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सेंद्रिय शेती धारण या समितीमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे मान्यतेने सेंद्रिय शेती धोरणा अंतर्गत बळीराजा कृषि विज्ञान मंडळ संचलित, सेंद्रिय शेतकरी प्रशिक्षण केंद्र लोळदगाव ता.जि. बीड येथे चालु आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकवेळी १०० प्रशिक्षणाची प्रशिक्षणासाठी निवासी सोय आहे. तसेच आतापर्यंत देशातून आणि परदेशातून शेतकरी आणि शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन कृषी मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कृषि आयुक्त उमाकांत दांगट, कृषि अधिकारी, पदाधिकारी व हजारो शेतकऱ्यांनी या संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला आयर्जुन स्वखुशीने भेटी दिलेल्या आहेत व संस्थेच्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि आज संपूर्ण मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात १४ जिल्ह्यात बळीराजा कृषि विज्ञान मंडळ, लोळदगाव ही संस्था सेंद्रिय शेतीत काम करत आहे. संस्थेने ८०० गांडूळ हौदांची निर्मिती केली असून चौदा हजार टन, खतांची निर्मिती वर्षाकाठी या हौदाद्वारे होत आहे. बायोडायनॉमिक कंपोस्ट खत निर्मितीचे ७०००० हजार डेपो महाराष्ट्रात निर्माण केले. त्याद्वारे १५०००० टन खताची निर्मिती शेतकऱ्यांनी केली आहे. संस्थेने केलेल्या सेंद्रिय खतांच्या प्रचार, प्रसारामुळे १,५०,००० शेतकऱ्यांपर्यंत प्रसार, माध्यम, दुरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे संदेश पोहचविले आहे. पैकी ७००००-८०००० शेतकऱ्यांनी साय शेती करायला सुरुवात केली आहे. संस्थेने केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यामध्ये गाथेला जाता आले व त्या गायातील शेतकन्यांचा सेंद्रिय शेतीकडे कल वाढतो आहे. तसेच सेंद्रीय शेतीमध्ये काम करण्यासाठी संस्थेकडे ३० कृषि डिप्लोमा व कृषि पदवीधर यांचा स्टाफ आहे व भविष्यात सेंद्रिय शेतीचे काम करण्यासाठी महाराष्ट्रात १००० कृषि पदवीधारकांच्या जागा भरविण्याचे नियोजन आहे. जेणे करुन सेंद्रिय शेतीचा पसार, प्रचार व चळवळ मोठ्या प्रमणात वाढवण्यास मदत होईल. शेतीव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहेत.